पृथ्वी शॉची पुन्हा एकदा धमाकेदार खेळी; नाबाद १८५ धावांची खेळी

दिल्ली: खराब कामगिरीमुळे भारतीय संघातून बाहेर पडलेल्या पृथ्वी शॉने विजय हजारे ट्रॉफीत पुन्हा एकदा धडाकेबाज शतकी खेळी करत निवड समितीचे दार ठोठावले आहे. मंगळवारी झालेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल मध्ये पृथ्वी शॉने नाबाद १८३ धावाच्या साहाय्याने मुंबईने सौराष्ट्रचा ९ गडी राखुन पराभव करत सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगीरीने निवड समितीने पृथ्वीला संघातून वगळले होते. त्यानंतर भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी तो मुंबईकडून विजय हजारे ट्रॉफीत खेळत आहे. या स्पर्धेतील पृथ्वी शॉने दैदीप्यमान कामगीरी केली आहे. या स्पर्धेत त्याने आधी दिल्लीविरुद्ध नाबाद १०५, त्यानंतर पुड्डुचेरीविरुद्ध नाबाद २२७ तर आता नाबाद १८५ धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने १२३ चेंडुत २१ चौकार आणि ७ उत्तुंग षटकार लगावले आहेत.

या सामन्यात सौराष्ट्रने प्रथम फलंदाजी करत २८५ धावा केल्या होत्या. मुंबईने हे लक्ष्य ४१.५ षटकात ९ विकेट राखून पार केले. मुंबईच्या या विजयात पृथ्वी पुन्हा एकदा हिरो ठरला.आता सेमी फायनलमध्ये त्यांचा सामना कर्नाटकशी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *